आज संध्याकाळी,
घुसमटलेपण असह्य झालं,
मनात पाचोळा पाचोळा झालेल्या स्मृतींशी,
एकांतात बोलण्यात बराच वेळ निघून गेला.
तरी त्यांचा चोथा झाला असं अजून म्हणवत नाही.
कारण ते घुसमटलेपण मला कुठेतरी हवयं.
तुझ्या आठवणींचं ते द्योतक आहे.
माझ्यातील उर्जेचा ते स्त्रोत आहे.
समोर सूर्य अस्ताला चाललाय.
आणि मी तुझ्यासोबत....
छे.... तु आहेस कुठे?
आहेत फक्त तुझ्या स्मृती... काळोखात नकळत विरणार्या...
घुसमटलेपण तीव्र करणार्या...
अन् तरीही....
तुझ्या आठवणींत रमण्यासारखी रमणीय संध्याकाळ नाही.
..
केदार
No comments:
Post a Comment