Sunday, July 29, 2012

संसार

कधी म्हणतेस... "घरातलं तेल संपलंय, साखर संपलीय, तांदूळ संपलेत..."
मी येतो घेऊन वाण्याच्या दुकानातून... नेहमीसारखं...
संसारासाठी नाहीतरी यांची गरज असतेच...

पण आज अकस्मात म्हणालीस...
"समजूतदारपणा संपलाय, गोडवा संपलाय, विश्वास तेलासारखा सांडून गेलाय...
सांडलेलं तेल हातानी निपटून घेत भरलं तरी त्याचा काय उपयोग?"

अन् मी म्हणालो...
"काही नाही तर त्या तेलाची एक पणतीच लाव घरात...
तोवर मी बघतो बाकीच्या सामानाचं..."

(संसारासाठी खरंतरं याचीच गरज जास्त असते)

तुमचा,
केदार
२८-जुलै-२०१२

No comments: